भारती एअरटेल आणि गुगल यांनी मिळून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे १५ अब्ज डॉलर्स (₹१.२५ लाख कोटी) इतक्या गुंतवणुकीतून एक जागतिक दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हब उभारण्याची घोषणा केली आहे.
भारती एअरटेल आणि गुगल यांनी मिळून आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे १५ अब्ज डॉलर्स (₹१.२५ लाख कोटी) इतक्या गुंतवणुकीतून एक जागतिक दर्जाचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हब उभारण्याची घोषणा केली आहे.
हा प्रकल्प २०२६ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने उभारला जाणार असून, गुगल आणि भारती एअरटेल यांच्या संयुक्त सहकार्याने तो भारतातील सर्वात मोठा “AI इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर हब” ठरणार आहे. याची एकूण क्षमता १ गिगावॅट असेल आणि तो जगातील अमेरिकेबाहेरील सर्वात मोठा AI कॅम्पस असेल. विशाखापट्टणम जिल्ह्यातील अदाविवरम, तर्लुवाडा आणि रामबिली या ठिकाणी तीन डेटा सेंटर्स स्थापन होणार आहेत.
हा प्रकल्प भारतासाठी नवे डिजिटल युग उघडणार आहे. केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या गुंतवणुकीचे स्वागत करताना सांगितले की, ‘India AI Vision’ साध्य करण्यासाठी ही पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावेल. अंदाजे १.८८ लाख लोकांना या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home