भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे मुंबई-पुणे दरम्यान सुरू
महाराष्ट्राने हरित ऊर्जा आणि टिकाऊ वाहतुकीच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलत भारताचा पहिला इलेक्ट्रिक हायवे मुंबई-पुणे दरम्यान सुरू केला आहे.
१७ ऑक्टोबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. हा देशातील पहिला पूर्णपणे इलेक्ट्रिक महामार्ग आहे. या हायवेद्वारे प्रवासी तसेच मालवाहतूक दोन्ही क्षेत्रात क्रांती घडविण्याची अपेक्षा आहे . तीन वर्षांत म्हणजे २०२८ पर्यंत हा हायवे पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, हे महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक धोरणाचे प्रतीक ठरणार आहे.
या प्रकल्पात ब्ल्यू एनर्जी मोटर्स या कंपनीने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक हैवी-ड्यूटी ट्रकचा शुभारंभ देखील याच कार्यक्रमात केला . या ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, ज्यामुळे चालकांना बॅटरी संपल्यावर काहीच मिनिटांत नवीन बॅटरी बसवता येईल. कंपनी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ३५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे, ज्याअंतर्गत ३०० इलेक्ट्रिक ट्रक तयार करणारा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाद्वारे भारतातील पहिल्या टप्प्यातील राष्ट्रीय महामार्गांचे विद्युतीकरण सुरू करण्यात आले आहे. पुढील तीन वर्षांत सर्व प्रमुख मार्ग इलेक्ट्रिक हायवेमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे . हा निर्णय भारताच्या नेट-झिरो कार्बन ध्येयाकडे जाणाऱ्या प्रवासात महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिला जात आहे .mumbai-पुणे इलेक्ट्रिक हायवे हा केवळ तांत्रिक नवकल्पना नसून तो हरित औद्योगिक विकासाकडे झेप घेणाऱ्या महाराष्ट्राच्या पुढाकाराचे प्रतीक आहे. हा मार्ग भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘ग्रीन मोबिलिटी’ मिशनच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल ठरणार आहे .

0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home